भारतीय संस्कृतीचा अक्षय वसा आणि वारकरी संप्रदायाची दैदिप्यमान परंपरा आता युरोपच्या भूमीवर सुवर्ण अक्षरांनी कोरली जाणार आहे. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, औंध यांच्या वतीने आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांच्या अहोरात्र ध्यासातून एक अलौकिक 'भक्ती-सेतू' उभारला गेला आहे.
विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या वेशीवर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून निघालेली ही भक्तीची वारी थेट जर्मनीतील 'विठ्ठल धाम' (भक्ती मार्ग) येथे विसावणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून श्रीकांत पाटील यांनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असून, श्री क्षेत्र आळंदीहून माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आणि श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची भव्य मूर्ती विमानाने सातासमुद्रापार मार्गस्थ झाली आहे.
"अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र | तरु पावन तो सुप्रभाती चरित्र ॥" आणि "भेटी लागी जीवा लागलीसे आस..." या अभंगवाणीची प्रचिती आता जर्मन भूमीवर येणार आहे.
सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आणि नेतृत्व या ऐतिहासिक कार्याचे शिल्पकार आणि प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील स्वतः या सोहळ्याचे सारथ्य करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ५५ भारतीय भाविकांचे पथक भारतीय तत्त्वज्ञानाचा हा ध्वज सातासमुद्रापलीकडे घेऊन गेले आहे.
या मंगलप्रसंगी लाभलेली इतर मान्यवरांची उपस्थिती:
- ॲडव्होकेट श्रीकांत पाटील, संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध पुणे
- सौ सुनीता श्रीकांत पाटील
- ह.भ.प. डॉ भावार्थ महाराज देखणे
- डॉ पूजा भावार्थ देखणे
- सुनील महाराज मोरे
- श्री ज्ञानेश्वर तापकीर, संस्थापक योगीराज पतसंस्था
- आडवोकेट गंधाली भिडे
- श्री अभिजित भिडे
- श्री दिलीप वाणी
- श्री योगेश कुलकर्णी
- श्री नितीन महाराज मोरे
- श्री विलास बालवाडकर
- श्री वसंत माळी
- श्री अंकुश चोंधे आणि सौ अरुणा चोंधे
- श्री श्रीकांत आणि सौ प्रतिभा येवले
- श्री रविकांत वर्पे
- विलास लांडे, मा. आमदार
- विजय बोथ्रे, उधोगपती इत्यादी अनेक.
अद्वितीय प्राणप्रतिष्ठा सोहळा
येत्या १९ एप्रिल २०२६, रविवार रोजी जर्मनीतील विठ्ठल धामात, ॲडव्होकेट श्रीकांत पाटील यांच्या विशेष उपस्थितीत, या मूर्तींचा 'प्राणप्रतिष्ठा सोहळा' अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि सोहळ्याच्या थाटात संपन्न होणार आहे. हे केवळ मूर्तींचे संचलन नसून, भारतीय अध्यात्माचा जागतिक स्तरावर झालेला विजयोत्सव आहे.
कौतुकाचा वर्षाव
अशक्यप्राय वाटणारे हे अलौकिक कार्य अत्यंत जबाबदारीने आणि निष्ठेने पूर्ण केल्याबद्दल ॲडव्होकेट श्रीकांत पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. औंधच्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानने या निमित्ताने जागतिक नकाशावर भारतीय संस्कृतिचा प्रसार केला आहे.