श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध' सांस्कृतिक सोहळा

सालाबाद प्रमाणे यावर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीच्या पादुकांचे औंध, पुणे येथे आगमन गुरुवार, दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी झाले. या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे सात दिवस सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ दिंडीने, शनिवार ०४-०२-२०२३ रोजी दुपारी उमाशंकर सोसायटी औंध येथून झाला. या सोहळ्यात दिनांक ०४ ते ०९-०२-२०२३ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व स्वामी समर्थ भक्त मोठ्या प्रमाणावर प्रवचन परिसंवाद, कीर्तन, संगीत, नृत्य व पुरस्कार या कार्यक्रमात  सहभागी झाले आणि आरती प्रसादाचा लाभ घेतला.

मानव धर्माचे अधिष्ठान परमार्थ व अध्यात्म आहे. एकविसाव्या शतकात अध्यात्माचा नवीन अर्थ शोधून मानव मानवतेकडे कसे उन्नत होईल हा दृष्टीकोन ठेऊन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान कार्य करीत आहे. विज्ञान, धर्म, कर्मकांड, अध्यात्म आणि मानवतेचा विकास ह्या सर्वांचा एकविसाव्या शतकात कसा समतोल राखता येईल; मानवतेची पातळी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरांवर कशी वाढवता येईल त्या साठिचा हा खारीचा वाटा आहे.

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना वर्ष २००१ मध्ये ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांनी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याद्वारे समाज प्रबोधनासाठी केली. उत्सवात दरवर्षी एक विषय घेऊन त्या विषयाभोवती सात दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे वीस पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले जातात. 

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाज प्रबोधनासाठी विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. "जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्यांशी सांगावे" या संतांच्या वचनाप्रमाणे त्यात वेदपठण, दिंडी,  वारकरी कीर्तन, भजन, प्रवचन, नारदीय कीर्तन, कीर्तन जुगलबंदी, भक्ती संगीत, नृत्य, परिसंवाद, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

श्री स्वामी भक्तांबरोबर, स्वामी नाम गजरामध्ये श्रींच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा ! पुण्यातील औंध-बाणेर परिसरात दर वर्षी श्री स्वामींच्या पालखीचे आगमन होते. या पालखी सोहळ्याचे "श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध" संस्थेतर्फे २००१ साला पासून आयोजन केले जाते. या आनंद सोहळ्यात परिसरातील भक्तजन मोठ्या संख्येने सहभागी होतात. 

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध चे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. मुख्यत्वेकरून भक्तांचा उस्फूर्तपणे मिळालेला प्रतिसाद, श्री स्वामींची पालखी, अनेक स्पर्धांचे आयोजन, वार्षिक स्मरणिका यांवर हे कार्य आधारित आहे. या कार्याचा लाभ अधिकाधिक लोकांना व्ह्यावा यासाठी या ईश्वरी कार्यात तन-मन-धनाने जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे नम्र आवाहन आहे.

समाजामध्ये दिव्य काम करणाऱ्या या व्यक्तींच्या कर्तृत्वाने समाज उन्नत होतो. या व्यक्ती अनुकरणीय असतात. म्हणून असाच एका व्यक्तीस श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठाणांतर्फे "श्री स्वामी समर्थ, औंध" पुरस्कार व मानपत्र देण्यात येते. दरवर्षी सामाजिक, आध्यत्मिक आणि शैक्षणिक कार्यात आग्रसेन असलेल्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित केले जाते.    

Shri Swami Samarth Pratishthan, Aundh, Pune is a registered Trust established in 2000 by a group of devotees with a common interest of overall development of the society by conducting various charitable work like competitive exams for school children, conducting various spiritual development activities, educational activities, helping old and needy section of the society etc. What started out small has now developed into a well rounded and well managed programs with the help of highly dedicated devotees of the trust and the people around. 

दर गुरुवारची स्वामींची आरती
दर गुरुवारची स्वामींची आरती

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दर गुरुव