प्रतिष्ठानची माहिती

स्थापना २००१ | संस्थापक अध्यक्ष ॲड. श्रीकांत गोविंद पाटील

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध पुणे दोन दशकाहून अधिक काळ अखंड समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे. प्रतिष्ठानचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. स्वामी कृपेचा विशेष लाभ विविध कार्यातून आणि उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य संस्था करते. त्या आधारे समाजाच्या सर्व थरातील लोकांचे सामाजिक आणि अध्यात्मिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. काळाच्या पलीकडे जाऊन आनंद देणारे, आत्मज्ञान देणारे, तत्वज्ञानाचा बोध देणारे, सात्विकशुद्ध सेवेची संधी देणारे विविध प्रयोगात्मक प्रयत्न प्रतिष्ठान तर्फे केले जातात. 

संस्थेच्या कार्याचे उद्देश 

सामाजिक उद्देश:

विचारांच्या माध्यमातून सकारात्मक विचारांनी कार्य करुन समाजाचा विकास व्ह्यावा यासाठी कार्य. समाज प्रबोधनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम करणे. 

अध्यात्मिक उद्देश:

विज्ञानावरच आधारित आपली संस्कृति आणि अध्यात्म याचे ज्ञान लोकांना विज्ञानाच्या पारिभाषेमध्ये आणि सर्व सामान्यच्या भाषेमध्ये समजावून देणे. समाज प्रबोधनासाठी विविध आध्यात्मिक कार्यक्रम करणे.

समाजाभिमुख लोकयज्ञ कार्य 

  • समाजविकासासाठी विविध विषयांवर अधिकारी व्यक्तींची प्रवचने 
  • समाजातील आदर्श व्यक्तींचा पुरस्कार देऊन यथायोग्य गौरव 
  • विविध सामाजिक विषयांवर परिसंवादचे आयोजन
  • आठवड्यातून नियमित एक तास प्रार्थना
  • मुलींच्या उत्तम आरोग्य आणि कलात्मक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी नृत्यस्पर्धा
  • स्त्रीयांसाठी स्वसंरक्षण ट्रेनिंग 
  • भावी पीढ़ी सुसंस्कारसंप्पन्न होण्यासाठी संस्कारवर्ग 
  • विद्यार्थ्यांसाठी योगासन शिबिर घेणे आणि त्याचवेळी समाजात योगाच्या महत्वाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न 
  • आरोग्यासाठी त्यांची विनाशुल्क वैद्यकीय तपासणी शिबिरें 
  • विविध आरोग्यविषयक पद्धतींवर व्याख्यानांचे आयोजन 
  • तुलसी रोपांचे दान
  • ईशावास्योपनिषद प्रमाणे निसर्गाचा सहवास देणार्या निसर्ग सहली 
  • सूर्य नमस्कार स्पर्धा

समाजाभिमुख आध्यात्मिक कार्य 

  • श्री स्वामींची पालखी निमित्त भव्य औंध' सांस्कृतिक सोहळा 
  • स्वामी भक्तांच्या घरी 'स्वामी आराधना' हा कार्यक्रम 
  • सामुहिक अग्निहोत्र  
  • महिला भजनी मंडळ व अनुषांगिक कार्यक्रम
  • पौरोहीत्य वर्गा तर्फे श्री स्वामींची षोडशोपचार पूजा, रुद्र व वेदपठण
  • कीर्तन, भजन, प्रवचन, कीर्तन जुगलबंदी यांचे आयोजन
  • ईस्टी यज्ञ पौर्णिमा
  • महिलांमधे सुसंवाद वाढविण्यासाठी महिला भजनी मंडळ व अनुषांगिक कार्यक्रम
  • बालवाडीपासून ते महाविद्यालयीन मुलांसाठी वैदिक विचारांच्या प्रसारकारितां वेद पठण करविणे आणि वेदॠचांचा अर्थ त्यांना समजावून सांगणे.
  • विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजन, संस्कारवर्ग
  • शालेय मुलांच्या मनांमधे लहानपणापासूनच समाजभान निर्माण करण्यासाठी वारकरी दिंड्या आयोजित करणे.

संस्थेच्या कार्याची फलश्रुती

•    २४ वर्षांपासून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याद्वारे समाज प्रबोधन कार्य 
•    २३ वर्षांपासून श्री स्वामींची पालखी हा सात दिवसांचा भव्य औंध' सांस्कृतिक सोहळा आयोजन 
•    १३ वर्षांपासून स्वामी नामगजरामध्ये श्रींची ग्रामप्रदक्षिणा घडविणारा दिंडी सोहळा 
•    १५ दिग्गज मान्यवरांना सामाजिक, आध्यत्मिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या दिव्य कार्याबद्दल पुरस्काराने सन्मानित 
•    १३ वर्षांपासून दर वर्षी २० पेक्षा जास्त विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन 
•    १३ वर्षांपासून पौरोहीत्य वर्गा तर्फे श्री स्वामींची षोडशोपचार पूजा, रुद्र व वेदपठण
•    १३ वर्षांपासून सामुहिक अग्निहोत्र केले  
•    १३ परिसंवाद कार्यक्रमात ६५ पेक्षा अधीक विविध विषयातल्या दिग्गज मान्यवरांचा सहभाग
•    १३ वर्षांपासून कीर्तन, भजन, प्रवचन, नारदीय कीर्तन, कीर्तन जुगलबंदी, भक्ती संगीत, नृत्य, यांचे आयोजन
•    १३ वर्षांपासून मोफत वैद्यकीय तपासणी, महिलांसाठी स्वसंरक्षण शिबीर,
•    १३ वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी स्तोत्र पठण, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजन 
•    788 हुन अधिक स्वामी भक्तांच्या घरी 'स्वामी आराधना' हा कार्यक्रम केला
•    'राजाधिराज श्री स्वामी समर्थ' स्मरणिका ६ अंक प्रकाशित

स्वामी कार्यातील स्वयंसेवा

स्वयंसेवा म्हणजे परमानंदाकडे नेणारी ईश्वरपूजा आहे. सेवकासह सगळ्यांना परम मांगल्य देते. श्रद्धापूर्वक केलेली स्वयंसेवा जन्मोजन्मीचे दुर्बल झालेले पापकर्म प्रेमाने धुऊन स्वच्छ करून देते. ही आत्मशुद्धी आहे. यातली यातून मिळणारी प्रचंड स्वामीशक्ती सेवकाची अनंत पापे पाल्यापाचोळ्या प्रमाणे उधळून टाकते.  

स्वामी सेवेच्या उपलब्ध संधी

•    दान: सेवा दान, द्रव्य दान, ज्ञान दान 
•    तप: स्वामी आराधना, स्वामीनाम जप. 
•    स्वयंसेवा:  नियमित सेवा, सण वार उत्सव यातील कार्य 
•    वैदिक कार्य: अग्निहोत्र, होम हवन, प्रासंगिक पूजा विधी

भविष्यातील वाटचाल

1) स्वामी आराधना- दर गुरुवारी संध्याकाळी एका कुटुंब कल्याणाची स्वामींना प्रार्थना
2) प्रातः प्रार्थना- दर रविवारी एका कुटुंबात सकाळी प्रार्थना, प्रसाद
3) उत्तम पिढी आणि आत्मबल वाढवण्यासाठी बाल संस्कार केंद्र

स्वामी कार्यातील द्रव्य विनियोग 

QR Code Shri Swamarth Prathisthan Aundh
जीपे, फोनपे, युपीआय पे ने देणगी देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा. 

प्रतिष्ठाणची सगळी कार्ये ही स्वामीभक्तांनी उस्फूर्तपणे वाहिलेल्या भेटी, दिलेल्या दानातुन केली जातात. गरजे नुसार दानाच्या रूपाने जे काही प्राप्त होते त्याचा संबंधित कार्यासाठी पूर्ण विनियोग केला जातो. अधिक गरज लागली तर पुंन्हा प्रयत्न केले जातात. प्रतिष्ठानचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्य संपूर्णपणे समाजाभिमुख आहे. या कार्याचा लाभ अधिकाधिक लोकांना व्ह्यावा यासाठी या ईश्वरी कार्याला जास्तीत जास्त साह्य करावे असे आपणा सर्वाना नम्र आवाहन आहे.

डोनेशन साठी माहिती

बँकेचे नाव: सारस्वत को ऑप बँक, आय. टी. आय. रोड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 083200100009540
IFSC Code: SRCB0000083

बँकेचे नाव: NKGSB को ऑप बँक लिमिटेड, औंध, पुणे.
अकाऊंटचे नाव: Shri Swami Samarth Pratisthan
सेविंग बँक अकाउंट नंबर: 567
IFSC Code: NKGS0000030

संस्थापक अध्यक्ष - ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना वर्ष २००१ मध्ये ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांनी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याद्वारे समाज प्रबोधनासाठी केली. लोकांचे कल्याण करावे उद्देशाने गेली तीस वर्षे अविरत समाजकार्य करीत आहेत. ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट जवळच्या रामपूर या गांवात झाला. स्वामींची कृपा पाटील घराण्यावर अनेक पीढ्यांपासून आहे. श्री स्वामी समर्थ महाराज घरी येऊन गेले. अनेक पुस्तकात याचा उल्लेख झाला आहे. त्यांचे उच्च शिक्षण पुण्यातल्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ़ कॉमर्स आणि इंडियन लॉ सोसायटीच्या आय. एल. एस. लॉ कॉलेजमधे झाले. त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली आहे. गेली तीस वर्षे ते अविरत समाजकार्य करीत आहेत. संत वाङमय, धार्मिक ग्रंथांचा त्यांचा गाढ़ा अभ्यास असून अलौकिक विषय त्याच्या बोलण्यातून सहज हाताळले जातात. अध्यत्मातले गूढ विचार लोकांच्या मनापर्यंत पोहोचतात. अनेक ठिकाणी प्रवचने तथा व्याख्याने यांच्या माध्यमांतून प्रतिष्ठानाला त्यांनी एका उच्च पातळीवर नेवून ठेवले आहे.

कार्यकारणी समिती २०२३

संस्थापक, अध्यक्ष- ॲडव्होकेट श्रीकांत गोविंद पाटील, कार्याध्यक्ष- श्री सौरभ देशपांडे, उपाध्यक्ष- श्री अंकुश चोंधे, कोषाध्यक्ष- श्री योगिनाथ काशिनाथ कुलकर्णी, श्री दिलीप वाणी, श्री अतुल रंगनाथ नाडगौडा, श्री संग्राम राजेंद्र मुरकुटे, सचिव- ऍड. सौ. गंधाली अभिजित भिडे, श्रीमती मंगला शशिकांत चाफळकर, सौ मिनाक्षी पाठक.